Pratibha Patil

शिक्षण

ताईंनी स्वत: पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्याने त्यांना शिक्षणाविषयी आस्था होती. विशेष करून मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाऊ नये याबद्दल कमालीच्या आग्रही होत्या. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शैक्षणिक प्रगती हा प्रमुख घटक समजला जावा असे त्यांचे मत होते. या संदर्भात त्या म्हणाल्या, ‘मानवी विकासाचा निर्देशांक आणि राष्ट्राची प्रगती ही शैक्षणिक निर्देशांकाद्वारे मोजली जावी, यामुळे प्रत्येक सुशिक्षित भारतीय हा भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये आपला बहुमोल वाटा उचलणारा आपला अमूल्य ठेवा बनेेल.’

Pratibha Patil - Women Empowerment

स्त्रीयांचे सबलीकरण

आपल्या राजकीय कारकिर्दीत ताई या सातत्याने स्त्रीयांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देऊन त्यांची समाधानकारक सोडवणूक होईल आणि स्त्रीयांना अधिक चांगली प्रतिष्ठा लाभेल याकडे त्या जातीने लक्ष देत असत. ‘स्त्रीयांचे सामाजिक आणि आर्थिक सबलीकरण’ या विषयांवर त्यानी २००८ साली राज्यपालांची समिती नेमली. या समितीने स्त्रीयांच्या उन्नतीसाठी योग्य असा अभ्यास करून आपल्या सूचना आणि शिफारसी केल्या. त्याआधारे भारत सरकारने स्त्रीयांचे सामाजिक आणि आर्थिक सबलीकरणासाठी समिती गठित करून योग्य अशा कालबध्द योजना साकारल्या.

लोककल्याणकारी कार्य

ताई या राजकारणी म्हणून यशस्वी ठरल्या. त्यांची कारकीर्द ही वाखाणली गेली त्याचबरोबर त्या मनाने मृदु कनवाळू, सर्वांची काळजी घेणार्‍या असल्याने त्या सर्वत्र लोकप्रिय होत्या. त्यांची परोपकारी वृत्ती, लोककल्याणाबाबतचा जिव्हाळा आणि मानवतावादी दृष्टिकोन बहुव्यापी होता. त्यांनी अत्यंत शांतपणे, गाजावाजा न करता आपल्या कार्याला योग्य दिशा मिळेल याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.

  • दंगल पीडितांना तातडीने सहाय्य

    जळगांवात १९७० साली मोठा दंगा भडकला होता.ताई त्या वेळेस महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याच्या उपमंत्री होत्या. त्यांनी तातडीने जळगावकडे धाव घेतली आणि कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता त्यांनी या दंगलीत जखमी झालेल्या लोकांच्यासाठी सातत्याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. ‘कुणीही योग्य वैद्यकीय उपचाराविना राहू नये’ असा सक्त आदेश त्यानी संबंधिताना दिला. सर्वत्र कमालीचा गोंधळ माजला होता. त्यांची गाडी या दंगलग्रस्त भागातून जात असताना एक मुलगा त्यांच्या गाडीजवळ मोठमोठ्याने रडत आला. त्याने आपल्या वडिलांची तब्येत अत्यंत खराब असल्याचे सांगितले. आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचेही त्याने सांगितले. ताईंनी त्याच्या याचनेला त्वरित प्रतिसाद दिला. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाला आदेश दिले की, त्याच्या वडिलांना चांगले उपचार मिळायला हवेत. चांगले वैद्यकीय उपचार आणि ईश्‍वराची कृपा यामुळे या जीवघेण्या आजारांतून वाचले. ज्या मुलाने आपल्या वडिलांसाठी ताईंच्याकडे धाव घेतली तो आज एक ख्यातनाम सल्लागार म्हणून ओळखला जातो.

  • जळगावच्या दंगलीत गोळीबारांत मुलाला झालेल्या जखमांची दखल घेऊन त्याचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न

    जळगावच्या दंगलीमध्ये पोलिसांनी गेलेल्या गोळीबारांमध्ये एका निष्पाप मुलाला गोळी लागून तो गंभीररीत्या जखमी झाला होता. स्थानिक डॉक्टरांच्या मते त्याची अवस्था अतिशय गंभीर होती, ताईंना ही घटना कळाल्यानंतर त्यांनी तातडीने पाऊले उचलली, त्या मुलाला त्यांनी जळगावहून मुंबईला हलविले. त्याची चांगली वैद्यकीय देखभाल होण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. तो मुलगा जगला. त्याने चांगल्या प्रकारे आपले शिक्षण पूर्ण केले. तो मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज आणि सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या, ऑर्थोपेडिक विभागाचा प्रमुख बनला. त्याचे नाव डॉ. ए. एस. चंदनवाले होय. आजही डॉ. चंदनवाले ताईंनी त्या वेळेस तातडीने पाऊले उचलून आपला जीव वाचविला याची आजही आठवण काढून कृतज्ञता व्यक्त करतात.

  • डॉक्टर स्त्रीची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून होणार्‍या जाचापासून मुक्तता

    ताई या महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य खात्यांमध्ये उपमंत्री होत्या तेव्हा त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्त्री डॉक्टरच त्या केन्द्राच्या प्रमुख असतील त्याची दक्षता घेतली. ग्रामीण भागांतील स्त्रीयांना पुरुष डॉक्टरांच्याकडून तपासून घेण्यास संकोच वाटत असे. अशाच एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्त्री डॉक्टरची नियुक्ती झाली. तिच्या निष्ठेने काम करण्याच्या वृत्तीबाबत आसपासच्या सर्व भागातून तिचे कौतुक होत असे. एकदा ती ताईंच्याकडे तिला एका वरिष्ठ डॉक्टरांच्याकडून होणार्‍या जाचाबद्दल तक्रार केली. ताईनी याबद्दल सविस्तर चौकशी केली आणि त्या तक्रारीची सत्यता पटल्यानंतर मुख्यमंत्र्याना त्याबाबत माहिती दिली. त्यानी संबंधित खात्याला तातडीची कारवाई करण्याचे आदेश दिले आणि सदर स्त्री डॉक्टरची होणार्‍या जाचापासून मुक्तता झाली.

Pratibha Patil

पर्यावरण

मानवाच्या हितासाठी आणि कल्याणासाठी ताई सातत्याने प्रयत्नशील राहिल्या. पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये, नागरीकरणामुळे पर्यावरणाला बाधा पोचू नये यासाठी ताईंनी पर्यावरणाच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी २५ जूलै २००८ रोजी पर्यावरणपूरक रोशनी या बोधवाक्याद्वारे आपले ध्येयधोरण स्पष्ट केले .त्यानी यासंदर्भात सुरुवातीचे पाऊल उचलले. राष्ट्रपती भवन हे हरित आणि पर्यावरण स्नेहाचा पुरस्कार करणारे असेल याची दक्षता घेतली. राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील ३४० एकर जागा ही पर्यावरणपूरक, हरित आणि नागरी मानवी वस्तीसाठी पूरक होईल याची दक्षता घेतली. या ठिकाणी ऊर्जासंवर्धन आणि वापर यांचा योग्य वापर होईल यासाठी काही ठोस पध्दती आखल्या. पर्यावरण व्यवस्थापन हे स्त्रिया आणि मुलें यांच्या माध्यमातून सजग विकास आणि सक्षम समाज होण्यासाठी त्यांनी रेसिडेंट वेल्फे अर असोसिएशन, स्त्रीयांचा स्वसहाय्य गट आणि शासकीय खात्यांची मदत घेऊन कचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन आणि जल-व्यवस्थापन सल्लागार समितीची नियुक्ती करून हा प्रभाग पर्यावरण पध्दतीचा आदर्श होईल याची दक्षता घेतली. तसेच या प्रकल्पाचा व्यपक विस्तार व्हावा यासाठी २०११ साली ‘रोशनीचे जागतिकीकरण’ याचा पुरस्कार केला. त्याद्वारे भारतातील विविध राजभवनांमध्ये हे प्रकल्प राबविले गेले.

Pratibha Patil - Rural Development

ग्रामविकास

ताई या ग्रामीण भागातून आल्या असल्याने त्याना ग्रामीण भागातील जनतेचे सामाजिक-आर्थिक प्रश्‍नाविषयी ठोस जाणीव होती. विशेषकरून कोरडवाहू शेतीवर ८० टक्क्याहून अधिक शेतकर्‍यांचे जीवन अवलंबून आहे आणि हे सर्व अत्यल्प उत्पन्न गटातील शेतकरी आहेत याची त्यांना जाणीव होती. त्यांच्या उन्नत जीवनांसाठी त्यानी दुसर्‍या हरित क्रांतीसाठी धोरण आखले जावे आणि त्यामध्ये कोरडवाहू आणि पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागासाठी विशेष योजना आखल्या जाव्यात यासाठी आदेश दिले. त्याचबरोबर शेती-उद्योग यांच्यामध्ये भागीदारी असावी, त्याद्वारे अन्न-प्रक्रिया उद्योगाचा विकास आणि छोट्या शेतकर्‍यांना आपल्या उत्पादनाची अधिक चांगली किंमत मिळावी यासाठी ठोस योजना आखण्यासाठी त्यां प्रयत्नशील राहिल्या.

National Portal Of India
Make in India
National Informatics Center
GOI Web Directory

संपर्क साधा

Translate »